
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY 2.0): राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेंतर्गत नवीन निर्णय घेण्यात आले आहेत.
योजनेचे मुख्य उद्दिष्टे:
- २०२५ पर्यंत १६,००० मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती.
- राज्यातील शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा.
योजनेतील महत्त्वाचे मुद्दे:
- वीज उपकेंद्राची देखभाल व सुधारणा.
- ग्रामपंचायतींना प्रोत्साहन.
- सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीसाठी २ हजार ८९१ कोटी रुपये अतिरिक्त निधीची मंजुरी.
- राज्य शासनाकडून सौर ऊर्जा निर्मितीसाठी ३०% आर्थिक सहाय्य.
फायदे:
- शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार.
- वन्य प्राणी व इतर धोक्यांपासून बचाव.
- राज्यातील वीज खरेदीचा दर कमी होणार.
- कृषी व औद्योगिक क्षेत्रातील अनुदानाचा आर्थिक भार कमी होणार.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४: शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज अधिक माहितीसाठी वेबसाईटवर भेट द्या.
संपर्कासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर भेट द्या.
अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा .
शुभेच्छा